बोलावणे आल्याशिवाय नाही…

बॉलीवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान याला कुपोषणाबाबत जनजागृतीसाठी केंद्र शासनाने हाती घेतलेल्या अभियानासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे आमीर ब्रँड अ‍ॅबेसेडर असलेल्या या अभियानाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळत नाही.

आमीरने ‘सत्यमेव जयते’ या मालिकेदरम्यान कुपोषणाची समस्या हाताळली होती. त्यानेच याबाबत महिला, बालकल्याण मंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यानुसार कुपोषणाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने सरकारने ‘कुपोषण- देश छोडो’ हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचा आमीरलाच ब्रँड अ‍ॅबेसेडर करण्यात आले. मात्र आमीर प्रचंड बिझी असून विदेशात चित्रीकरण करीत आहे. त्यामुळे त्याच्याकडे या अभियानासाठी वेळ नाही; असे सांगितले जात आहे.

मात्र आतल्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार आमीरला या अभियानासाठी सरकारी बाबू किंवा कोणा मंत्र्यांनी नव्हे तर खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वत: आमंत्रित करावे; अशी इच्छा आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी बोलाविल्याशिवाय नाही… अशी भूमिका आमीरने घेतल्याचे समजते.

Leave a Comment