
नवी दिल्ली दि.३- मॉन्सून पावसाने देशात सर्वत्र ओढ दिलेली असली तरी त्यामुळे दुष्काळाची भीती बाळगण्याची मुळीच आवश्यकता नाही, मॉन्सून उशीरा येत असला तरी तो नेहमी इतकाच पाऊस देईल, असा विश्वास केन्द्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
२ जुलैपर्यत केवळ ३१ टक्के पाऊस पडल्याची कबुली देऊन ते म्हणाले की, काही राज्यात लवकर पेरण्या होत असतात. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच, उत्तर प्रदेश, बिहारचा काही भागास त्याचा फटका बसला आहे.
