मुंबई,२ जुलै-मंत्रालयात लागलेली आग हा घातपात नसून केवळ अपघात आहे, असा अहवाल फॉरेन्सिक लॅबने दिला आहे.
मंत्रालयाच्या इमारतीला आग लावल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचा उल्लेख या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे ही आग फक्त अपघात असून घातपात नसल्याचा शेरा देण्यात आला आहे.
मंत्रालयाला लागलेली आग हे एक षडयंत्र असू शकते, अशी शक्यता विरोधकांनी वर्तवली होती.
पण त्याचवेळी सत्ताधार्यांसह राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी या अग्निकांडात संशय घेण्यास जागा नसल्याचे म्हंटले होते.
मंत्रालयाला २१ जून रोजी आग लागली होती. या आगीत मंत्रालयाचा पाचवा, सहावा मजला जळून खाक झाला होता. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये मंत्रालयातील दोन कर्मचार्यांचा समावेश आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर सर्व सरकारी इमारतींचे फायर ऑडिट करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.