
मुंबई, दि. ७ – राज्य मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याबाबत आपल्याकडे पुराव्यासह तक्रारी दाखल झाल्यास त्याची दखल घेता येईल. मात्र, प्रसारमाध्यमातून केल्या जाणार्या आरोपांमधून पुरावे मिळत नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जलसंपदा मंत्र्यांवरील आरोपाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
