
रायपूर, दि. २८ – कॉंग्रेसचे महासचिव राहुल गांधी शनिवारी मुख्यमंत्र्यांचा गृहजिल्हा असलेल्या सातार्याला भेट देऊन दुष्काळी भागाची पाहणी करणार असल्याच्या वृत्तामुळे, आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडण्यासाठी आसुसलेल्या सातारकरांच्या पदरी शनिवारी केवळ पोकळ आश्वासनेच पडली. युवराज राहुल गांधी यांनी अवघ्या अडीच तासात दुष्काळी भागातील आम आदमीच्या वेदना जाणून घेत तेथून काढता पाय घेतला.
