राष्ट्रवादी हा स्वार्थी, दहशतवादी आणि पैशाचा गैरवापर करणारांचा पक्ष- मुख्यमंत्री

केंद्रीय कृषीमंत्री शरदराव पवार यांनी स्वार्थासाठी काँग्रेस फोडली आणि जनशक्तीचा पाठिबा मिळत नाही असे पाहिल्यावर त्यांनी दहशत आणि पैसा यांचा बेसुमार वापर केला अशी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच काल जाहीर केल्याने महापालिका निवडणुकीच्या आठवडाभर राहिलेल्या प्रचाराच्या काळात सारा प्रचार कोणत्या दिशेने जाणार याची दिशा स्पष्ट झाली आहे. कालपरवापर्यंत एकमेकाच्या वस्त्रहरणात फक्त नारायण राणे, आर आर पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सहभागी होत होते आता मात्र मुख्यमंत्रीही त्या टीकेच्या रिंगणात उतरले आहेत. लोकामधून निवडून न आलेल्या लोकांची टीकाही आपण गंभीरपणे घेत नाही, अशी टिपणी नुकतीच शरदराव पवार यांनी केली होती. आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरच आजपर्यंत वारंवार राज्यसभेवर आणि विधानपरिषदेवर निवडून जाण्याची वेळ आली असल्याने ते बोलणे मुख्यमंत्र्यांना जोराने झबले व ते आता जोराची टीका करू लागले आहेत.गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी राष्ट*वादीवर राज्यसहकारी बँक बुडवल्याचा आरोप केला होता. उस्मानाबाद येथे बोलताना तर त्यांनी डॉ पद्मसिह पाटील यांचा भ्रष्टाचार बघा आणि तुम्हीच निर्णय घ्या की, कोणाला मत द्यायचे असेही आवाहन केले. काँग्रेसमधून राष्ट*वादी पक्ष फुटून निघाल्यावर कॉग्रेसकडून अशी जहरी टीका प्रथमच होत आहे.

Leave a Comment