नवी दिल्ली दि.२४-अण्णा हजारे टीमशी मध्यस्त म्हणून बोलणी करण्याची जबाबदारी केंद्रीय विज्ञानतंत्रज्ञान मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचे वृत्त आहे.ही नेमणूक करण्या अगोदरच केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी देशमुख यांच्यासेाबत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचीही भेट घेतली असल्याचे समजते.
गेले तीन दिवस महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी यांनी अण्णा टीमशी चर्चेच्या तीन फेर्या केल्या असून ते आता मुंबईला परतले आहेत. उद्या केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक याच संदर्भात बोलावली आहे. मात्र महाराष्ट्रातही अण्णांच्या उपोषण आंदोलनात विलासराव देशमुख यांनी यशस्वीपणे चर्चा करून समेट घडवून आणला असल्याने सध्या तरी ही जबाबदारी विलासरावांकडेच देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते