
कोणताही माणूस दोन मार्गांनी आपले व्यक्तिमत्त्व प्रकट करीत असतो. कृतीने आणि शब्दाने. आपले पंतप्रधान मनमोहनसिग हे दोन्ही बाबतीत दुबळे आहेत. तसे अनुभवाला येत होते. त्यामुळे सरकारची लोकप्रियता कमी होत होती. सारे काँग्रेस नेते अस्वस्थ झाले होते. त्यांनी पंतप्रधानांना दुबळेपणाची ही प्रतिमा पुसून टाकावी असा आग्रह धरायला सुरूवात केली. हा सल्ला पंतप्रधानांनी मानला आणि त्यांनी आता देशातल्या काही वृत्तपत्रांच्या संपादकांना बोलावून त्यांच्याशी काही चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. आपली काही ठाम मते सांगितली. आपण दुबळे पंतप्रधान नाही असे कणखरपणे सांगितले. ते पदावर असताना राहूल गांधी यांच्या पंतप्रधान होण्याची चर्चा सुरू होते, काँग्रेसचे नेतेच राहुल गांधी आता पंतप्रधानपद सांभाळण्यास सक्षम झाले आहेत असे म्हणून नकळतपणे मनमोहनसिग यांच्या निवृत्तीची भाषा करायला लागतात, हा दुबळेपणाच आहे. म्हणून या चर्चेत हा विषय आला तेव्हा, मनमोहनसिग यांनी, आपण कोणत्याही क्षणी पायउतार व्हायला तयार आहोत असे ‘कणखरपणे’ म्हटले. त्यांचा हा कणखरपणा खरेच मानला पाहिजे. मात्र ही चर्चा करणार्याद दिग्विजय सिगांना ना ते शब्दाने बोलू शकले ना काँग्रेस अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी त्यांना चाप लावू शकल्या.
