नाशिक : महाराष्ट्रात माफियांचे राज्य असल्याचा मुंडे यांचा आरोप

नाशिक, ६ मार्च – महाराष्ट्रात सरकारचे राज्य नसून माफियांचे राज्य आहे, असा आरोप भाजपाचे महासचिव, खा. गोपीनाथ मुंडे यांनी केला. नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या एका मेळाव्यात ते बोलत होते. खा. मुंडे पुढे म्हणाले की, राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार हे माफियांचे गुलाम आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सरकारला घालविण्यासाठी सामान्य नागरिकांनी सक्रिय झाले पाहिजे. राज्यात महागाई वाढली असून भ्रष्टाचाराची लागण झालेल्या सरकारला खाली खेचण्यासाठी संघर्ष सुरु झाला आहे. पेट्रोल, दूध भेसळ, आदर्श घोटाळ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

मेळाव्यास माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर, खा. प्रतापदादा सोनावणे, हरिश्चंद्र सोनावणे, गोपाळराव पाटील, अजय बोरस्ते, उपमहापौर देवयानी फरांदे, भाजपाचे शहराध्यक्ष विजय साने, लक्ष्मण सावजी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment