
सायबर गुन्ह्यांची वाढती प्रकरणे पाहता केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी कठोर कारवाई करत 6 लाख 69 हजार सिमकार्ड आणि 1 लाख 32 हजार आयएमईआय ब्लॉक केले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की डिजिटल फसवणूक करणारे घोटाळेबाज या सिमकार्डचा वापर करत होते, त्यामुळेच सरकारने वेळ न घालवता कारवाई केली आणि त्यांना ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला.
अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्यांचा सरकारने वाजवला बँड, सर्वसामान्यांचे वाचवले 3,431 कोटी रुपये
वृत्तानुसार, सरकारने योग्य वेळी कारवाई केल्यामुळे 3431 कोटी रुपयांची बचत झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गृहराज्यमंत्री संजय कुमार यांनी राज्यसभेत सांगितले की, आर्थिक फसवणूक आणि फसवणूक करणाऱ्यांकडून पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी I4C अंतर्गत 2021 मध्ये सिटीझन फायनान्शियल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग आणि मॅनेजमेंट सिस्टम सुरू करण्यात आली होती. आत्तापर्यंत 9.94 लाखांहून अधिक तक्रारींमध्ये 3431 कोटी रुपयांहून अधिकची आर्थिक बचत झाली आहे.
सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांची तक्रार करण्यासाठी सरकारने 1930 हा हेल्पलाइन क्रमांकही सुरू केला होता. दूरसंचार विभागाने सुरू केलेल्या चक्षू या सेवेद्वारे तुम्ही फसवणुकीची तक्रार दाखल करू शकता.
तक्रारीसाठी https://sancharsaathi.gov.in/ वर जावे लागेल आणि नंतर साइटवरील Citizen Centric Services वर क्लिक करावे लागेल. यानंतर रिपोर्ट सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढील पानावर Continue for Reporting हा पर्याय दिसेल. तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
पुढील चरणात, काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात जसे की एसएमएस, कॉल किंवा व्हॉट्सॲपद्वारे तुमची फसवणूक कशी झाली. काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुमची तक्रार ऑनलाइन नोंदवली जाईल. सायबर गुन्हे टाळण्यासाठी, नेहमी लक्षात ठेवा की अज्ञात लिंकवर क्लिक करू नका आणि मजबूत पासवर्ड तयार करा.
