
भारतीय क्रिकेट संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची T20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला गेला, ज्यात टीम इंडियाने बाजी मारली. यासह भारताने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाची नजर मालिका जिंकण्यावर आहे आणि कर्णधार रोहित शर्माला रविवारी इंदूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने मालिका जिंकावी, अशी इच्छा आहे. मात्र या सामन्यापूर्वी रोहित शर्माला टेन्शन आहे. या सामन्यात रोहितला एक बदल करावा लागेल आणि रोहितसमोर प्रश्न आहे की त्याने कोणाला वगळावे.
मोहालीत टीम इंडिया जिंकली, पण रोहित शर्मासमोर सर्वात मोठा प्रश्न – कोणाला बाहेर करायचे?
इंदूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियामध्ये एक बदल निश्चित आहे, कारण या सामन्यात विराट कोहली पुनरागमन करेल. त्याची मुलगी वामिकाचा वाढदिवस असल्याने तो पहिला सामना खेळला नाही, पण कोहली आता संघात सामील झाला असून तो दुसऱ्या टी-20 सामन्यात खेळणार हे निश्चित आहे.
2022 साली झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत कोहलीने भारतासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता. यानंतर तो आणि रोहित टी-20 मधून ब्रेकवर होते. मात्र, रोहित आणि कोहलीने यावर्षी खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी स्वत:ला उपलब्ध असल्याचे घोषित केले आहे आणि त्यामुळेच कदाचित या दोघांची अफगाणिस्तान मालिकेत निवड झाली आहे. ही मालिका विश्वचषकापूर्वीची भारताची शेवटची टी-20 मालिका आहे आणि या स्थितीत कोहली खेळणार हे निश्चित आहे. आता रोहित कोणाला वगळणार हा प्रश्न आहे. कोहलीच्या आगमनाचा ठपका जर कोणावर पडत असेल, तर तो आहे तिलक वर्मा. गेल्या सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर खेळला होता. त्याची कामगिरीही विशेष नव्हती. त्यामुळे कोहलीला खेळवण्यासाठी रोहित तिलकला वगळण्याची दाट शक्यता आहे.
याशिवाय रोहित आणखी एक बदल करू शकतो. गेल्या सामन्यात यशस्वी जैस्वालच्या जागी शुभमन गिलला संधी मिळाली. जैस्वालला मांडीचा त्रास होता आणि त्यामुळेच तो खेळला नाही. त्याच्या जागी गिलला पुन्हा संधी मिळाली. दुसऱ्या सामन्यात जैस्वाल तंदुरुस्त राहिल्यास गिलला बाहेर जावे लागू शकते.
