
भारतीय संघ 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेला सुरुवात करत आहे. याकडे टी-20 विश्वचषक 2024 ची रंगीत तालीम म्हणूनही पाहिले जात आहे. कारण ही मालिका परदेशात होत असून, आफ्रिकेसारख्या मोठ्या आणि बलाढ्य संघाविरुद्ध भारताचे युवा खेळाडू मैदानात उतरणार आहेत. अशा परिस्थितीत खेळाडूंवर बारीक नजर ठेवण्यासाठी यावेळी निवड समितीही दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे.
सीआयडीचा हा अभिनेता निवडणार विश्वचषकासाठी संघ, करणार दक्षिण आफ्रिकेचा दौरा!
दोन निवडकर्ते टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जात आहेत, त्यापैकी सलील अंकोला आणि एस.एस. दास यांचा समावेश आहे. हे दोघेही भारत अ आणि भारतीय संघाच्या सामन्यांदरम्यान दक्षिण आफ्रिकेत उपलब्ध असतील. निवड समिती अशा खेळाडूंवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतील जे विश्वचषक संघात बसू शकतील. आज आम्ही तुम्हाला सलील अंकोलाबद्दल सांगणार आहोत, जो पूर्वी अभिनेता होता आणि आता भारतीय संघाचा निवडकर्ता आहे.
55 वर्षीय सलील अंकोला हा बीसीसीआयच्या निवड समितीचा सदस्य आहे, तो मूळचा सोलापूर, महाराष्ट्राचा आहे. यंदा नवीन निवड समिती स्थापन झाल्यावर मंडळाने त्याला स्थान दिले होते. सलील अंकोलाने भारतासाठी एक कसोटी आणि 20 एकदिवसीय सामने खेळले आहेत. वजनदार शरीरयष्टी असलेल्या सलील अंकोलाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणातच हॅट्ट्रिक घेत खळबळ उडवून दिली, त्या जोरावर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले.
मात्र, सलील अंकोला भारतीय संघात विशेष काही करू शकला नाही. त्याने 1 कसोटीत 2 आणि 20 एकदिवसीय सामन्यात 13 बळी घेतले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सलील अंकोलाने 15 नोव्हेंबर 1989 रोजी सचिन तेंडुलकर सोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, एकीकडे सचिन क्रिकेटचा देव बनला तर दुसरीकडे सलील अज्ञातात हरवून गेला.
सुमारे 8 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर सलील अंकोला टीव्ही आणि चित्रपटांकडेही वळला. त्याने सीआयडी, सावधान इंडिया सारख्या मालिकांमध्ये काम केले, याशिवाय त्याने संजय दत्तसोबत कुरुक्षेत्र या चित्रपटातून पदार्पण केले. टीम इंडियाच्या या निवडकर्त्याने अर्धा डझनहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून बिग बॉसमध्येही तो दिसला आहे.
या सगळ्यात सलील अंकोला त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आले. कधी पहिल्या पत्नीपासून घटस्फोटाची बातमी, तर कधी त्याच्या नशेच्या व्यसनाने सलील अंकोला खूप दु:ख दिले. मात्र, नंतर त्याने खूप सुधारणा केल्या आणि हळूहळू त्याचा परिणाम त्याच्या व्यावसायिक आयुष्यातही दिसू लागला. 2020 मध्ये, तो मुंबई क्रिकेट असोसिएशनचा मुख्य निवडकर्ता बनला आणि त्यानंतर 2023 मध्ये तो भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीमध्ये पोहोचला.
