
नवी दिल्ली – फेब्रुवारीत जाहीर झालेल्या अंतरीम अर्थसंकल्पात वाहनांवरील उत्पादन शुल्क कमी केल्याने विविध वाहन कंपन्यांनी आपल्या कारच्या किमती कमी केल्या होत्या. मात्र आता उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे कारण देऊन महिंद्रा, टाटा आणि होंडा या वाहन उत्पादक कंपन्यांनी कारच्या किमती वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बाकी वाहन कंपन्याही त्यांच्या वाहनांच्या किमती वाढीची घोषणा लवकरच करतील असेही सांगितले जात आहे.
