
रिक्रूट एक्स या संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात भारतातील किमान ६० टक्के कर्मचार्यांना येत्या सहा महिन्यात नोकरी बदलण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा आहे. ५८ टक्के कर्मचार्यांना नवीन नोकरीत बढतीच्या जागी जाता यावे अशी इच्छा असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार आजच्या कर्मचार्यांना जादा पैसा मिळविण्यापेक्षा वरीष्ठ पद मिळविणे, नेतृत्वाची पोझिशन कायम राहणे हे अधिक महत्त्वाचे वाटते आहे.
