
विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत रुतुराज गायकवाडने पुन्हा धमाका केला आणि आसामविरुद्धच्या सामन्यात 125 चेंडूत 168 धावा करून बाद झाला. गायकवाडने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 6 षटकार मारले. उपांत्यपूर्व फेरीत गायकवाडने एका षटकात 7 षटकार मारले होते आणि 220 धावांची खेळी खेळली होती. आता उपांत्य फेरीतही ऋतुराजच्या बॅटने धुमाकूळ घातला आणि चौकार-षटकारांची बरसात करत त्याने गोलंदाजांचा समाचार घेतला . गायकवाड उपांत्य फेरीत द्विशतक झळकावण्यास हुकले असले तरी त्याच्या या खेळीने चाहत्यांची मनेही जिंकली. गायकवाडने १३३.३३ च्या स्ट्राईक रेटने धावा करत धमाका केला. गायकवाडनेही ८८ चेंडूत शतक पूर्ण केले.
ऋतुराज गायकवाड ची पुन्हा तुफानी खेळी, मारले १८ चौकार आणि ६ षटकार
WATCH – Red-hot @Ruutu1331 smashes another massive ton in the #VijayHazareTrophy 👏👏
📹📹https://t.co/TzsWpaFowa #MAHvASM #VijayHazareTrophy #SF2
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 30, 2022
