भारत विरुद्ध पाक सामना म्हणजेच लढाई- विजय झोल

नवी दिल्ली्- भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्हार संघा दरम्यान होणारा सामना हा नेहमीच लढाईसारखाच असतो. या दोन्हाा संघा दरम्यानन सामनासुरू असताना मैदानावर युध्द च सुरु आहे का असे प्रेक्षकांना वाटते, असे मत १९ वर्षाखालील भारतीय संघाला आशिया चषक जिंकून देणा-या कर्णधार विजय झोलने प्रसारमाध्याोमाशी बोलताना व्यक्त केले आहे.

आशिया चषक विजेतेपदाच्याप लढतीत कर्णधार विजय झोलने (१००) आणि संजू सॅमसन (१००) यांच्या शानदार शतकांच्या बळावर भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ४० धावांनी मात केली. ही कामगीरी करताना त्यानी युवा (१९ वर्षांखालील) आशिया चषक विजेतेपदावर भारताचे नाव कोरले.

या विजयाबाबत प्रतिक्रया व्यक्त करताना कर्णधार विजय झोल म्हणाला, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात प्रत्येक चेंडू हा एखादी लढाईच सुरू असल्याचे भासवत असतो. त्यामुळे या लढाईत विजय प्राप्त करणे तितकेच महत्वाचे आणि प्रतिष्ठेचे होते. वर्षानुवर्षे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात प्रेक्षकांची अलोट गर्दी असते आणि तितकाच अभुतपूर्व सामनाही दोघांमध्ये रंगतो. प्रेक्षकांच्याा प्रोत्सा्हनामुळे हा सामना खेळताना खेळाडूना मोठी प्रेरणा मिळते.

फायनला सामन्यातत झोलने १२० चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांसह आपली शतकी खेळी साकारली, तर सॅमसनने फक्त ८७ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ४ षटकारांनिशी आपली खेळी उभारली. त्यामुळे भारताला ५० षटकांत ३१४ धावांचे आव्हान उभारता आले होते. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानला ९ बाद २७४ धावा करता आल्या. त्यांच्या कमरान गुलामने ८९ चेंडूंत १२ चौकारांसह नाबाद १०२ धावा केल्या. गेल्या वर्षीही भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ अंतिम फेरीत आमनेसामने होते. त्यावेळी हा सामना टाय झाल्यामुळे आशिया चषकात दोन्ही संघ संयुक्त विजेते झाले होते. मात्र, यावेळी भारतीय संघाने पाकिस्तान संघाला चोख प्रत्युत्तर देऊन भारतीय संघाने ‘विजय’च्या नेतृत्वाखाली विजय प्राप्त केला