नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या बुधवारच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 14,506 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे कालच्या तुलनेत सुमारे 25 टक्क्यांनी अधिक आहे. त्याच वेळी 30 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. कालच्या आकडेवारीत 11,793 प्रकरणे नोंदवली गेली आणि 27 रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, गेल्या 24 तासांत 11,574 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 99,602 वर पोहोचली आहे, जी कालच्या तुलनेत 2902 अधिक आहे. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 5,25,077 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीत काल दिवसभरात 874 नवीन कोरोनाबाधितांची नोंद
दिल्लीतील कोरोनामुळे पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. गेल्या 24 तासांत येथे 874 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीत 628 प्रकरणे समोर आली होती आणि तीन लोकांचा मृत्यू झाला होता.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 हजार 482 रुग्ण आढळले
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 हजार 482 रुग्ण आढळले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आज 1113 रुग्ण जास्त आले आहेत. दुसरीकडे, मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासांत येथे कोरोनाचे 1290 रुग्ण आढळून आले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये मास्क अनिवार्य
केरळमधील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. मंगळवारी, केरळ पोलिसांनी सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांना सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत.