
नवी दिल्ली – सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना काल पत्रकारांशी बोलताना अरविंद केजरीवाल यांच्याशी असलेले आपले मतभेद लपवता आले नाहीत. अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी स्वीकारलेला राजकीय पक्ष स्थापनेचा निर्णय चुकीचा आहे, असे ते म्हणाले. केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन केल्यामुळे ते आपल्यापासून दूर गेले. जनलोकपाल विधेयकासाठी संघर्ष करणारा गट विस्कळीत झाला, पण हा गट एकत्रित राहिला असता तर देशाचे चित्र वेगळे झाले असते, असेही अण्णा हजारे म्हणाले.
