
औरंगाबाद(बिहार)- बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात माओवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात सात पोलिस शहीद झाल्याची घटना मंगळवारी घडली, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक सुशील खोपडे यांनी दिली. हे जवान गस्त घालत असताना ही घटना घडली. नबीनगर-टंडवा मार्गावर गस्त घालणा-या पोलिसांची गाडी या स्फोटात उडवण्यात आल्याची माहिती पोलिस महासंचालक रविंद्र कुमार यांनी दिली.
