![](https://www.majhapaper.com/wp-content/uploads/onions_1.jpg)
लखनौ – कांदा वाहतूक करणारा ट्रक उत्तरप्रदेशातील महामार्गावर १० जणांच्या टोळीने लुटून ट्रक चालक आणि क्लीनरला ठार केल्याची घटना घडली. गुरूवारी रात्री मध्यप्रदेशातून येत असलेल्या या ट्रकचा पाठलाग १० जणांच्या टोळीने दोन इंडिका कारमधून केला व हा ट्रक अडवला. त्यानंतर त्यांनी चालक व क्लिनरला बाहेर खेचून गोळ्या घातल्या व ट्रकमधील माल लंपास केला. पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक केली असून बाकीच्यांचा शोध सुरू आहे.
या संबंधी जौनपूर चे पोलिस सुपरिटेंडेंट हॅपी गुप्तन म्हणाले की गेले कांही महिने भाजीपाल्याचे ट्रक लुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दोन महिन्यांपूर्वीही असाच टोमॅटो वाहतूक करणारा ट्रक लुटून दरोडेखोरांनी चालकाला ठार केले होते मात्र क्लिनर पळून जाण्यात यशस्वी झाला होता. कांद्याचे भाव सध्या गगनाला भिडलेले असल्याने दरोडेखोरांनी आता कांदा वाहतूक करणार्याघ ट्रकवर लक्ष केंद्रीत केले आहे. अशा प्रकारच्या आठ घडना आत्तापर्यंत घडल्या असून ही टोळी तमीळनाडूतील असावी असा पोलिसांचा संशय आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून म्हणजे कांदा दर भडकल्यापासून पोलिसांनी कांदा वाहतूकदार ट्रक मालक व चालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.