ठाणे: ठाणे परिसरात एकाच रात्रीत झालेल्या तीन जाळपोळीच्या घटनांनी सर्वत्र दहशत पसरली आहे. रघुनाथनगर भागातील आनंतस्मृती जिम अज्ञातांनी जाळले. त्या सोबतच आता या भागातील सहा बाईक्सही जाळण्यात आल्या. त्याञमुळे ठाणे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे पोलिस जाळपोळीच्याल कारणाचा शोध घेत आहेत.
गेल्या काही दिवसांपसून ठाणे परिसरात जाळपोळीचे प्रकार घडत आहेत. याठिकाणी रविवरी रात्री करही अज्ञातांनी त्यानंतर जऱ्हंडेवाडी आणि हजुरी परिसरात तीन बाईक्स जाळल्या. त्यानंतर किसन नगरमध्येही एक बाईक जाळण्यात आली.
मध्यरात्री एक ते पहाटे तीन दरम्यान ही जाळपोळ झाली. जाळीचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकारामुळे ठाणे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व घटनाक्रमाचा तपास पोलिस घेत असून जाळपोळीच्या कारणाचा शोध घेत आहेत. जाळपोळीमुळे