
इस्लामाबाद – काश्मीर ही पाकिस्तानची प्राणवाहिनी असल्याचे मत पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आज (मंगळवार) व्यक्त केले. याबरोबरच, काश्मीरवरून भारत व पाकिस्तानने युद्ध करण्यापेक्षा येथील गरीबी व रोगराई दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादनही शरीफ यांनी यावेळी केले.
