
मुंबई, दि. 7 – महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या आवारात मोबाईल फोनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असून या संबंधात उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या प्रमुखांना पत्र पाठवून त्यांची मते मागवून घेतली आहेत.
