बंगळुरु – भाजपा व आरएसएसची कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी अप्रत्यक्षपणे हिटलरच्या नाझी पक्षाची तुलना करत संताप व्यक्त केला आहे. देशभरातून अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी निधी उभारण्याचे काम केले जात आहे. याच दरम्यान अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याचेही उघडकीस आले असून, थेट जर्मनीत हिटलरच्या काळातील परिस्थितीचा हवाला स्वामी यांनी दिला आहे. नाझींनी हिटलरच्या काळात जे केले, ज्यात लाखो लोकांचे जीव गेले. तसाच काहीसा प्रकार सुरु असल्याची संतप्त टीका कुमारस्वामी यांनी केली आहे.
It appears that those collecting donations for the construction of Ram Mandir have been separately marking the houses of those who paid money and those who did not. This is similar to what Nazis did in Germany during the regime of Hitler when lakhs of people lost their lives..
— H D Kumaraswamy (@hd_kumaraswamy) February 15, 2021
Historians say that RSS took birth at the same time when Nazi Party was founded in Germany. There are concerns on what will happen if the RSS tries to implement similar policies adopted by Nazis. The fundamental rights of people are being snatched away in the country now..
— H D Kumaraswamy (@hd_kumaraswamy) February 15, 2021
यासंदर्भात कुमारस्वामी यांनी ट्विटस् करत कुणीही आपली मत मांडू शकणार नाहीत, अशी परिस्थिती भाजपा तयार करत असल्याचा हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर सध्या असे दिसत आहे की, राम मंदिरासाठी स्वंतत्रपणे देणगी देणाऱ्या व न देणाऱ्यांच्या घरांवर वेगवेगळ्या खूणा केल्या जात आहे. जर्मनीमध्ये नाझींनी हिटलरच्या शासन काळात जे केले, ज्यामुळे लाखो लोकांचे जीव गेले. हे सगळे तसेच सुरू आहे. भारतात जे काही बघायला मिळत आहे. हे सगळे आपल्याला शेवटी कुठे नेऊन ठेवणार आहे याची मला माहिती नसल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.
The country is witnessing a situation where one cannot freely express his or her views. This is nothing but an undeclared emergency.
— H D Kumaraswamy (@hd_kumaraswamy) February 15, 2021
अशी परिस्थिती देशात तयार केली जात आहे की, कुणीही आपली मते मांडू शकणार नाही. प्रसारमाध्यमांनी जर सरकारचे विचार स्वीकारले तर काय होईल, मला माहिती नसल्यामुळे अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसांचे भविष्य काय असेल, याचा अंदाज लावणेही अवघड आहे. देशात काहीही घडू शकते, असे स्पष्ट संकेत मिळू लागले असल्याची चिंता कुमारस्वामी यांनी व्यक्त केली.
It is clear from the emerging trends that anything may happen in the country.
— H D Kumaraswamy (@hd_kumaraswamy) February 15, 2021
आरएसएसवरही स्वामी यांनी निशाणा साधला आहे. नाझी पक्षाची जेव्हा जर्मनीमध्ये स्थापना झाली, त्याच वेळी आरएसएसचा उदय झाला, असे इतिहासकार सांगतात. काळजीचे कारण हे आहे की, आरएसएसने जर नाझी पक्षाची धोरणे लागू करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? देशात आता लोकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले जात आहेत. तो किंवा ती कुणीही खुलेपणाने आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही, अशी स्थिती देशात निर्माण झाली आहे. हे दुसरे काहीही नसून, अघोषित आणीबाणीच असल्याचा कुमारस्वामी यांनी केला आहे.