जळगावात टेम्पो पलटून 16 जणांचा मृत्यू


जळगाव : जळगावात झालेल्या भीषण अपघातात 16 जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. हा भीषण अपघात किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात टेम्पो पलटी होऊन झाला. आभोडा येथील 12 , केऱ्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 मजूर यात मृत्यूमुखी पडले आहेत तर 5 गंभीर जखमी झाले आहेत. किनगावजवळ मध्यरात्रीच्या सुमारास आयशर टेम्पो पलटून हा अपघात झाला, ज्यात 16 जणांचा मृत्यू झाला. यातील बहुतांश मृतक हे रावेर तालुक्यातील असल्यामुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे. माहितीनुसार हा टेम्पो पपई भरुन रावेरकडे निघाला होता. त्याचवेळी मध्यरात्रीच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो पलटी झाला. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे.