लखनौ – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार सध्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून विरोधकांच्या निशाण्यावर असून योगी सरकारला हाथरस प्रकरणासह उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवरून सवाल केले जात आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास रोखल्यानेही सरकारवर टीका होत असून योगी सरकारला बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी सल्ला दिला आहे.
2. इसके बाद वहाँ मीडिया के जाने पर भी उनके साथ हुई बदसलूकी तथा कल व परसों विपक्षी नेताओं व लोगों के साथ पुलिस का हुआ लाठीचार्ज आदि अति-निन्दनीय व शर्मनाक। सरकार को अपने इस अहंकारी व तानाशाही वाले रवैये को बदलने की सलाह, वरना इससे लोकतन्त्र की जड़े कमजोर होंगी। 2/2
— Mayawati (@Mayawati) October 5, 2020
हाथरस प्रकरणात सरकारच्या भूमिकेसंदर्भात बसप नेत्या मायावती यांनी ट्विट केले आहे. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी व सर्व सत्य माहितीची घेण्यासाठी तिथे २८ सप्टेंबर रोजी सगळ्यात आधी बसपचे शिष्टमंडळ गेले होते. पण त्यांचा संवाद पोलीस ठाण्यात बोलवूनच घडवून आणण्यात आला. या संवादानंतर मिळालेला अहवाल अत्यंत दुःखदायक होता. मला माध्यमांकडे जाण्यास ज्याने मजबूर केले, असे मायावती यांनी म्हटले आहे.
त्यानंतर तिथे गेलेल्या माध्यमांसोबतही गैरवर्तन करण्यात आले. विरोधी पक्षांचे नेते व लोकांवर काल, परवा पोलिसांकडून झालेला लाठीमार.. हे सगळे अतिशय निषेधार्ह व लज्जास्पद आहे. अंहकारी व हुकुमशाही वृत्ती सरकारला बदलण्याचा सल्ला आहे. नाहीतर यामुळे लोकशाहीची मूळच कुमकूवत होतील, असा सल्ला मायावती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे.