
नवी दिल्ली दि.६ – पुढील वर्षाच्या मार्चपासून भारतातील मोबाईल ग्राहकांना फ्री रोमिंग
ची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. टेलिकॉम विभागाने मोबाईल कंपन्यांना मार्च पासून फ्री रोमिंग देण्याचे आदेश जारी केले आहेत. केंद्र सरकारने फ्री रोमिंगची केलेली घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी हे आदेश दिले गेले असले तरी पूर्वीपासून मोबाईल कंपन्यांनी फ्री रोमिंगला विरोध केला आहे. यामुळे कंपन्यांचा महसूल १० टक्कयांनी घटण्याची व हे नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांना दरवाढ करावी लागेल असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र आता सरकारी आदेशच निघाल्याने मार्चपासून फ्री रोमिंग ग्राहकांना उपलब्ध होईल.
