
नवी दिल्ली दि.२६- राष्ट्रपतीपद भूषवितानाच्या पाच वर्षांच्या काळात मिळालेल्या भेटी कार्यकाल संपल्यानंतर राष्ट्रपतीभवन सोडताना प्रतिभाताई पाटील यांनी आपल्या अमरावतीच्या घरी नेल्याने त्या वादात सापडल्या आहेत. माहिती अधिकार हक्क कायद्याखाली कार्यकर्ते सुभाष आगरवाल यांनी न्यायालयात याविषयी याचिका दाखल करून या सर्व भेटी १३ जानेवारी २०१३ पर्यंत परत मागविल्या जाव्यात असा अर्जही केला होता. या अर्जाला उत्तर देताना सर्व भेटी परत मागविल्या जातील असे आगरवाल यांना कळविण्यात आले असून नवनिर्वाचित राष्ट्रपती प्रणवदा मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेताच हा निर्णय घेतला असल्याचे प्रसिडेंट प्रेस सेक्रेटरीकडून सांगण्यात आले आहे.
