
नवी दिल्ली: बर्याच दिवसापासून वादग्रस्त असण्यापासून ‘वंचित’ राहिलेल्या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना कोळसा खाण घोटाळ्याच्या मुद्द्यावरून संसद ठप्प झाल्यावर पुन्हा कंठ फुटला आहे. संसदेत गदारोळ करणार्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांना संसदेबाहेर फेकून द्यावे; असा मौलिक सल्ला त्यांनी दोन्ही सभागृह अध्यक्षांना दिला आहे.
