
विद्यार्थी दहावी-बारावी उत्तीर्ण झाले किंवा पदवी परीक्षा देऊन बाहेर पडले की, आता पुढे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. तो केवळ उभाच राहतो असे नाही तर त्यांना गोंधळात सुद्धा टाकतो. अशावेळी त्यांनी पुढे कोणत्या वाटा चोखाळाव्यात याचे मार्गदर्शन त्यांना कोणाकडून तरी मिळण्याची गरज असते. असे मार्गदर्शन करणे हा सुद्धा एक चांगला व्यवसाय आहे आणि मानसशास्त्राची जाण असणार्या कोणाही तरुण-तरुणीला व्यवसाय मार्गदर्शनाचे आणि समुपदेशनाचे हे कार्य करून आपले करिअर घडवता येते. एकंदरीत युवकांनी आपले करिअर कसे घडवावे, याचे मार्गदर्शन करणारे हे करिअर आहे.
