
नवी दिल्ली, दि. ३ – तब्बल ५८ दिवसांनी एअर इंडियाच्या ४३४ वैमानिकांनी संप मागे घेतला . येत्या ४८ तासांत संप मागे घेण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्याने गेल्या ५७ दिवसांपासून संपावर असलेल्या एअर इंडिया वैमानिकांच्या संघटनेने दिल्ली उच्च न्यायालयाला संप मागे घेण्यात येत असल्याचे सांगितले. प्रलंबित वेतन आणि भत्ते वेळेत न मिळाल्यामुळे वैमानिकांनी संप पुकारला होता.
