
इस्लामाबाद दि.२ – संशयित दहशतवादी जबीउद्दीन अन्सारीने आपण कराची येथून मुंबईवरील हल्ल्याचे नियंत्रण करीत होतो, अशी कबुली दिल्यानंतर ४८ तासांत या दहशतवादी हल्ल्यात ४० भारतीय नागरिकांचा हात होता, असा दावा सोमवारी पाकिस्तानने केला आहे.‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ ने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाला देऊन म्हटले आहे की, आमच्या माहितीनुसार किमान ४० भारतीय नागरिकांचा मुंबईच्या २६/११ हल्ल्यात हात होता.
