
नवी दिल्ली, दि.२ – भारताच्या सुरक्षेत एक मोठे छिद्र पडले आहे. वृत्त येत आहे की, चीनने भारतीय लष्कराचे संगणक हॅक करून गुप्त माहिती चोरी केली आहे. चीनने संगणकाला वायरसद्वारे हॅक केले आहे. माहितीनुसार लष्कराचे तीन संगणक हॅक झाले आहे आहे. सुत्राचे मानले तर विशाखापट्ट्नममध्ये सध्या ईस्टर्न नेवल कमांडचे काही संगणकांना हॅक करून त्यामार्फत माहिती जमा करण्यात आली. वृत्त असेही आहे की, हॅकर्सने या संगणकात बग प्लांट करून गुप्त डेटा जमा केला.
