राहुल यांच्या मंत्रीपदासाठी एस एम कृष्णा आग्रही

नवी दिल्ली दि.२७ – देशातील सध्याच्या समस्या सोडवण्यासाठी, काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी मंत्रिमंडळात येणे आवश्यक आहे, असे मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस एम कृष्णा यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरफार होण्याची शक्यता  गृहीत धरून कृष्णा यांनी राहुल गांधी यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशासाठी जोर धरला आहे.

राहुल गांधी हे मंत्रिमंडळात सहभागी होतील, असे पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी यापूर्वीच म्हटल्याचे कृष्णा यांनी सांगितले.

मंत्रिमंडळामध्ये आम्हाला नेहमीच राहुल गांधींचा समावेश हवा आहे. पंतप्रधानांनीही त्यांना सरकारमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. मात्र, सध्या राहुल गांधींच त्यासाठी इच्छुक नसल्याचे दिसत आहे,’ असे कृष्णा यांनी पत्रकारांना सांगितले.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी प्रणवदांनी राजीनामा दिला आहे. तर तिकडे केंद्रीय लघु उद्योग मंत्री वीरभद्र सिंह यांच्यावर न्यायालयाने भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध केल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात फेरफार होणार आहे.

Leave a Comment