
सोलापूर, दि.१९ – गेल्या सहा महिन्यांपूर्वी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील तलाठयांना महसूल विभागाकडून लॅपटॉपचे मोठ्या थाटामाटात वाटप करण्यात आले होते. शेतकर्यांना जागेवरच त्यांचा सातबारा उतारा मिळावा, या हेतूने शासनाने ही योजना सुरू केली, परंतु सध्या या कर्मचार्यांचे लॅपटॉप त्यांच्या मुलांचे खेळणे बनल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
