
पुणे दि.१९-आषाढी वारीसाठी जाणार्या ९ वारकर्यांचा नीरा नदीत ट्रक कोसळल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला असून सात वारकरी जखमी झाले आहेत. हा अपघात आज म्हणजे मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास झाल्याचे समजते. जखमींवर लोणंद येथील सावंत रूग्णालयात उपचार सुरू असून पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
