
सोलापूर, दि. १२ – ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, अशी म्हण असली तरी यंदा साखर कारखाने मुळासकट ऊस घेणार असल्याने शेतकरीवर्गाचा फायदा होणार आहे. पावसाचे कमी प्रमाण, चाराटंचाईमुळे ऊसाचा चारा म्हणून केला जाणारा उपयोग; तसेच साखर कारखान्यांची वाढती संख्या, कारखान्यांच्या गाळप क्षमतेत झालेली वाढ यामुळे यंदा साखर कारखान्यांवर गाळपासाठी मिळेल तसा ऊस घेण्याची वेळ येणार आहे.
