
नवी दिल्ली, दि. ८ – भारत आणि पाकिस्तानच्या गृहसचिवांची ११ व १२ जून रोजी बैठक होणार आहे. या दोन दिवसीय बैठकीत सियाचीन भागातून सैन्य कमी करण्याचा विचार भारत करू शकतो. याआधी देखील भारत आणि पाकिस्तानी गृहसचिवांची बैठक पार पडली होती. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली होती.
