
मुंबई, दि. २३ – एअर इंडियातील वैमानिकांच्या आंदोलनाचा फटका आंबा निर्यातीला बसला असून, दररोज २०० ते २१५ टन होणारी आंब्याची निर्यात १०० टनांनी घसरली आहे. अन्य विमान कंपन्या अव्वाच्या सव्वा भाव आकारत असल्यामुळे आंबा निर्यात करणे मुश्कील झाले असून, शेतकरी व व्यापारी वर्गाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे.
