
मुंबई दि.२२ – महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी दुष्काळाने आपले पाय पुन्हा पसरलेले दिसत असतानाच गेल्या कांही दिवसांत सातत्याने वाढत चाललेल्या तापमानाचा विदर्भावर फारच विपरित परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या उन्हामुळे विदर्भातील सुमारे ४३०० खेडी अक्षरशः कोरडी पडली असून या भागातील तळी, सरोवरे,विहीरी आणि पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहेत. बहुतेक भागांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी कित्येक ठिकाणी टँकरनेही केवळ पिण्यापुरते आणि जनावरे जगविण्यापुरतेच पाणी मिळू शकते आहे. अन्य बाबींसाठी पाण्याचा वापर करता येणे अशक्यच बनले आहे.
