नवी दिल्ली – उद्यापासून म्हणजेच 1 जूनपासून भारतीय रेल्वे नवीन 200 प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने याआधी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली होती. 21 मे पासून या गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी तिकिटांचे बुकिंग सुरू झाले आहे. सर्व विशेष गाड्यांसाठी रेल्वेने आगाऊ आरक्षण कालावधी (एआरपी) 30 दिवसांवरून 120 दिवसांपर्यंत वाढविला आहे.
200 Special Trains to run across the country from tomorrow, transporting people in a safe & comfortable manner.
कल से देश भर में शुरु हो रही हैं 200 स्पेशल ट्रेन, नागरिकों का घर जाना होगा और आसान व सुरक्षित।
▶️ https://t.co/kEtCULH08A pic.twitter.com/1lP3jg5H4u
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 31, 2020
याबाबत रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल अॅपद्वारे उद्यापासून सुरु होणाऱ्या 200 गाड्यांसाठी तिकीट बुक करू शकतात. या व्यतिरिक्त निवडक रेल्वे स्थानक, टपाल कार्यालये, प्रवासी तिकीट सुविधा केंद्र, अधिकृत एजंट, प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) आणि सामान्य सेवा केंद्राच्या (सीएससी) काउंटरवरून देखील तिकीट बुक करू शकतात.
दरम्यान, प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक असेल. तसेच आपण जात असलेल्या स्टेशनवर पोहोचल्यानंतर प्रवाशांना राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी बनविलेले हेल्थ प्रोटोकॉल पाळावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.