काश्मीरमधील परिस्थितीबाबत सोशल मीडियावर बॉलिवूडला अलविदा केलेली काश्मिरी अभिनेत्री झायरा वसीमने एक पोस्ट शेअर केली आहे. झायराने या पोस्टमध्ये काश्मीरमधील परिस्थितीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या पोस्टमध्ये झायराने लिहिले आहे की, कधीही, कोणीही काश्मीरमधील लोकांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लागू करते.
पोस्टमध्ये झायराने लिहिले आहे की, सतत काश्मिरी लोक अपेक्षा आणि नैराश्याचा सामना करत आहेत. नैराश्य आणि दुःख असलेल्या ठिकाणी शांती असल्याचे खोटे पसरवण्यात येत आहेत. कोणीही काश्मिरी लोकांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लागू करते. अशा परिस्थितीत आम्हाला का ठेवले जात आहे. जिथे आमच्यावर निर्बंध आहेत.
आपल्या पोस्टमध्ये झायराने आणखी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. ती म्हणाली की, आमचा आवाज दाबणे जेवढे वाटते एवढे सोपे का आहे? आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध लावणे एवढे सोपे का आहे? आमचे विचार मांडण्याचे आम्हाला स्वातंत्र्य का नाही? आमची मते न ऐकताच त्यांना खारिज केले जाते. कोणतीही भीती आणि चिंतेशिवाय आम्ही सामान्य माणसांसारखे का जगू शकत नाही?
झायराने म्हणते की, कशाप्रकारे समस्यांचा सामना काश्मिरी लोकांना करावा लागतो. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, कोणत्याही काश्मिरी व्यक्तीला आयुष्यभर समस्या, निर्बंधांमध्ये का जगावे लागते. या गोष्टी वाईट असूनही त्या एवढ्या सामान्य का आहेत? असे अनेक प्रश्न आमच्या मनात येतात. आमच्या या प्रश्नांची सरकार उत्तरे देणे दूरच पण प्रश्न ऐकूनही घेत नाही. आमच्या शंका आणि प्रश्नांना पूर्णविराम देण्यासाठी थोडाही प्रयत्न करत नाही.
दरम्यान, मीडियाच्या भूमिकेवरही झायराने प्रश्न उपस्थित केला आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, काश्मिरमधील परिस्थितीबाबत मीडियाने जे चित्र दाखवले आहे. त्यावर विश्वास ठेवू नका, आमचा आवाज शांत केला आहे आणि कधीपर्यंत… आपल्यापैकी कोणीही वास्तव जाणून घेत नाही.