नवी दिल्ली – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी व बाबरी मशीद विवाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर एक अजब वक्तव्य केले असून ओवेसी यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा ‘पूर्ण न्याय’ नसल्याचे म्हटले आहे.
The Supreme Court’s judgment in the Babri Masjid title suit is by no means the “complete justice” that the powers under Article 142 are required to be used for. It is, at best, “incomplete justice” or, at worst, “complete injustice.” https://t.co/0oiV0iqRHV
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) November 19, 2019
बाबरी मशीद जमीन मालकीच्या वादात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल, हा पूर्ण न्याय नाही. कलम १४२ नुसार त्यात असेलेले अधिकार न्यायालयाने वापरायला हवे होते. हा एक उत्तम अपूर्ण न्याय आहे व सर्वात वाईट पूर्ण अन्याय असल्याचे ट्विट ओवेसी यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अयोध्याप्रकरणी दिलेल्या निकालानंतर ओवेसी यांनी याअगोदर देखील नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. मला माझी मशीद परत हवी, असल्याचे वादग्रस्त ट्विट त्यांनी केले होते. तसेच, बाबरी मशीद जर पाडली गेली नसती, तर काय निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असता? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असला तरी अचूक नाही. ही लढाई कायदेशीर हक्कासाठी होती. जमिनीची खैरात नसल्याचे ओवेसी यांनी म्हटले होते.