सिनेसृष्टीमध्ये काही कलाकारांचा मोठा दबदबा आणि मान असतो. त्यांचे एखाद्या चित्रपटामध्ये असणेही त्या चित्रपटासाठी मोठी जमेची बाजू असते. या क्षेत्रात त्यांनी दिलेले मोठं योगदान त्यामागे असते. मोजकेच चित्रपट असे कलाकार करतात पण त्यांनी केलेली निवड खूपच अभ्यासपूर्ण असते. गिरीश कर्नाड हे अशाच काही मोजक्या कलाकारांपैकी एक मोठे नाव आहे. गिरीश कर्नाड यांनी तब्बल ३३ वर्षांनंतर मराठी चित्रपटामध्ये भूमिका साकारली आहे. पण त्यांच्या दुर्दैवाने ती आयुष्यातील अखेरची भूमिका ठरली.
गिरीश कर्नाड यांनी ‘उंबरठा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटात भूमिका केली होती. प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटीलच्या पतीची भूमिका ३३ वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या या चित्रपटात केली होती. त्यानंतर अद्याप त्यांनी कोणताही मराठी चित्रपट केलेला नाही. एका १६ – १७ वर्षांच्या तरुण-तरुणीची प्रेमकथा ‘सरगम’ या चित्रपटात आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचीही या चित्रपटात मोठी भूमिकाही आहे.
'ऋत्विक केंद्रे' चा आगामी चित्रपट "सरगम" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Read Full Story with Photoshttps://t.co/M9DDK3NaBY#kendrerutwikk pic.twitter.com/81wrcgxfyQ— मराठी सिनेयुग (@MarathiCineyug) April 21, 2018
कर्नाड यांनी चित्रपटात आयुष्यात सारे काही मिळवून झाल्यानंतर हे सगळे वैभव म्हणजे आयुष्य नव्हे, असा विचार करून एक व्यक्ती जंगलामध्ये निघून जाते आणि पुढचे आयुष्य तिथेच घालविते. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. कर्नाड यांच्या घरी जाऊन त्यांच्या चित्रपटाची कथा चित्रपट दिग्दर्शक शिव कदम यांनी त्यांना ऐकविली. त्यांना कथा ऐकताच ती विलक्षण आवडली आणि त्यांनी लगेचच या चित्रपटात काम करण्यास होकार दिल्यामुळे ३३ वर्षांनंतर या मोठ्या कलाकाराला मराठीत पुन्हा अभिनयासाठी घेऊन येण्याची संधी चित्रपट निर्माते महेंद्र केसरी व कदम यांनी मिळवून दिली.
गिरीश कर्नाड यांच्याशिवाय ती भूमिका अन्य कोणी करू शकणार नाही, मला याबद्दल खात्री होती. त्यामुळे ती भूमिका त्यांनीच करावी यासाठी मी आग्रही होतो. कथा आणि त्यांचे पात्र ऐकून घेताच ती भूमिका करण्यास त्यांनीदेखील होकार दिला. गिरीशजी काम करणार ही माझ्यासह मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठी गोष्ट होती. हा चित्रपट निःसंशय उत्कृष्ट तयार होईल. असे चित्रपट दिग्दर्शक शिव कदम आणि निर्माते एम के धुमाळ यांनी सांगिलते ते पुढे म्हणाले.
पण असे असले तरीही सध्या सेन्सॉरच्या कात्रीत ‘सरगम’ हा चित्रपट अडकला असून लवकरच तो प्रदर्शित करू अशी ग्वाही निर्माता आणि दिग्दर्शकांनी दिली आहे. मात्र गिरीश कर्नाड यांच्या अचानक जाण्याने चित्रपटाच्या टीमला मोठा धक्का बसला आहे.