मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर मी अयोध्येत आत्महत्या करेन


नवी दिल्ली – २०१९ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत तर अयोध्येत जाऊन मी आत्महत्या करेन असे खळबळजनक वक्तव्य शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केले आहे. तसेच आपल्याला कट्टरवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी म्हटल्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या या भुमिकेमुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत रिझवी म्हणाले, कोणत्याही धर्मापेक्षा राष्ट्र हे मोठे असते. जेव्हा राष्ट्रहिताची गोष्ट मी करतो तेव्हा कट्टरवादी लोक मला जीवे मारण्याची धमकी देतात. सत्तेतून मोदी सरकार जाऊ द्या तुमचे तुकडे-तुकडे करु अशा आपल्याला धमक्या येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

जे देशप्रेमी आहेत त्यांच्या मनात नरेंद्र मोदींबाबत प्रेम आहे आणि देशद्रोह्यांच्या मनात भीती आहे. देशाचे मोदी उत्कृष्ट पंतप्रधान आहेत. २०१९ मध्ये जर मोदी पंतप्रधान झाले नाहीत आणि इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता देशद्रोह्यांच्या पाठींब्याने पंतप्रधान बनला तर मी अयोध्येत राम मंदिराच्या गेटवर जाऊन आत्महत्या करने, कारण देशद्रोह्यांच्या हातून मरण्यापेक्षा मी स्वाभिमानाने मरणे पसंद करेन, असे रिझवी यांनी म्हटले आहे.

Leave a Comment