17 व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर देशभरात एकच गोंधळ उडाला. प्रत्येक पक्षाने घोषणे आधीच आपली मोट बांधयला सुरु केली होती. त्यात सरकार यावेळी तृतीयपंथींबद्दल गंभीर असल्याचे जाणवत असल्यामुळे 5 तृतीयपंथी उत्तर प्रदेशमधून यंदा लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर भवानी नाथ वाल्मीकि (भवानी मां) यांना इलाहाबादमधून तिकीट दिले. किन्नरांचा यावेळी कुंभमेळ्यात वेगळा आखाडा होता. भवानी माँची त्यात चर्चा होती.
प्रियांका गांधींचा नुकत्याच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या किन्नर गुलशन बिंदूंवर प्रभाव आहे. त्या 2012च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या होत्या. त्या जिंकल्या नाहीत पण त्यांनी 20 हजार मते मिळवली आणि भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांच्या पराभवाचे कारण बनल्या.
उत्तर प्रदेशमध्ये दबंग किन्नर आशादेवी लोकप्रिय असून आशादेवी उर्फ अमरनाथ 2001मध्ये गोरखपूरच्या पालिका निवडणुकीत जिंकल्या होत्या. सपाच्या अंजू चौधरींचा अपक्ष आशादेवींनी 60 हजार मतांनी पराभव केला.
किन्नर पायलने 2002च्या विधानसभा निवडणुकीत लखनौच्या पश्चिम भागात उभ्या असलेल्या भाजपच्या लालजी टंडनना जोरदार टक्कर दिली होती.
जन अधिकार पक्षाची किन्नर पूनम 2017च्या रायबरेली येथील पालिकेच्या निवडणुकीत उभी होती. पूनमने पालिकेत त्यावेळी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता.