18 व्या वर्षात नाही तर या वयात एखादी व्यक्ती होते ‘अ‍ॅडल्ट’

brain
भरपूर वर्षांनी आपल्याला जर आपला शाळकरी मित्र भेटला तर आपण त्याची विचारपूस करतोच पण त्यावेळी तू आता म्हातारा झाला आहेस असे देखील बोलण्यात वेळ दौडत नाही. त्यावेळीच तू डोक्यात पांगळा झाला आहेस का असे प्रतिउत्तर समोरच्या मित्राकडून मिळते. हा झाला गंमतीचा भाग, पण एखादी व्यक्ती कधी प्रौढ होते यावर अनेकों मते आपल्याला ऐकायला मिळतात. पण नुकत्याच एका संशोधनातून याचा खुलासा करण्यात आला आहे. या संशोधनानुसार, व्यक्ती तोपर्यंत अ‍ॅडल्ट म्हणजेच प्रौढ होत नाहीत, जोपर्यंत ते 30 वय ओलांडत नाहीत. मेंदूच्या अभ्यासकांनुसार, 18व्या नाही तर 30 व्या वर्षी मेंदूचा पूर्ण विकास होतो.

याबाबत अभ्यासकांचे असे म्हणने आहे की, व्यक्तीच्या मेंदूमध्ये नर्व्सचे कार्य, विकासाशी निगडीत प्रक्रिया गर्भापासून सुरू होऊन अनेक दशकांपर्यंत सुरू असते. मेंदूच्या विकासाची प्रक्रिया आणि त्यामुळे होणाऱ्या बदलांचा तरूणांच्या व्यवहारावर मुख्य प्रभाव पडत असतो. याने ते मानसिक समस्यांबाबत अतिसंवेदनशील होतात. लहान मुलांमध्ये किशोरावस्थेदरम्यान अनेकदा व्यवहाराशी संबंधित समस्या बघायला मिळतात. याकडे या वयात मेंदूमध्ये होणाऱ्या बदलांशी जोडून बघितले जाते आणि असे मानले जाते की, किशोरावस्था संपल्यावर ही समस्या दूर होईल, पण असे नसते. कॅम्ब्रिज विश्वविद्यालयामधील न्यूरोसायंटिस्टचे प्राध्यापक पीटर जोन्स यांच्यानुसार, जी परिभाषा बालपणापासून प्रौढ स्थितीत पोहोचण्याबाबत मानत आलो आहोत, ती आता बालिश वाटायला लागली आहे. मेंदूचा विकास बाल्यावस्थेपासून प्रौढ होताना फार सूक्ष्म होतो आणि साधारण तीन दशकांपर्यंत ही प्रक्रिया सुरूच असते. शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आणि कायदे व्यवस्थेने त्यांच्या सुविधेसाठी ही परिभाषा ठरवली असल्याचे, ते म्हणाले.

यावर कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातील प्राध्यापक डेनिअल गेश्विंद यांनी जोर दिला आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूच्या विकासाचा स्तर वेगवेगळा असतो. ते म्हणाले की, व्यावहारिक कारणांमुळे, शिक्षण प्रणालीने व्यक्तींऐवजी समूहांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी चूक केली आहे. स्किट्जोफ्रेनियासारख्या मनोवैज्ञानिक स्थितींवर पर्यावरणाच्या पडणाऱ्या प्रभावावर अभ्यासकांनी चर्चा केली. त्यांच्यानुसार, किशोरावस्था आणि अर्ली ट्वेन्टीजमध्ये स्किट्जोफ्रेनियाची लक्षणे दिसणे सामान्य बाब आहे. एकदा मेंदूने जर त्याचे सर्किट छाटले आणि पूर्णपणे त्याचा विकास झाला तेव्हा व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारच्या मनोविकृतीचा धोका कमी होतो. प्राध्यापक जोन्स यांच्यानुसार, जे लोक शहरांमध्ये राहतात, खासकरून गरीब आणि प्रवासी लोकांना आजूबाजूच्या पर्यावरणीय प्रभावांमुळे मानसिक विकारांचा धोका जास्त राहतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment