मुंबई : टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे हा चक्क थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचला असून त्याने सोशल मीडियावर शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जर सुखाचा घास आपण घेत असू तर तो फक्त शेतकऱ्यामुळे, म्हणून शेतकऱ्याला कधीही विसरु नका, असे आवाहन अजिंक्य रहाणेने केले आहे.
एका शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे
माझ्या मनात शेतकऱ्यांकरिता खूप आदर आहे. जर आज आपल्या ताटामध्ये अन्न आहे, ते फक्त शेतकऱ्यांमुळे. त्यांच्या दररोजच्या मेहनतीमुळे आज आपण सुखाचे घास घेत आहोत.#TuesdayThoughts pic.twitter.com/HDsr4Vf3jo— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) March 12, 2019
अजिंक्य रहाणे या व्हिडीओत एका शेतकऱ्यासोबत दिसत आहे. याबाबत तो सांगतो, मी देखील एका शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे शेतकऱ्यांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. आज जर आपल्या ताटामध्ये अन्न आहे, ते फक्त शेतकऱ्यांमुळेच. त्यांच्या दररोजच्या मेहनतीमुळे आज आपण सुखाचे घास खात आहोत.