फेकिस्तान; भारताचे विमान पाडल्याचा दावा खोटा

pakistan1
इस्लामाबाद – काल पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांचे तळ नष्ट केल्यानंतर पाकिस्तानचा तीळ पापड झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानी हवाई दलाने आज त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतात घुसून प्रतिहल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण त्यांचे मनसुबे भारतीय हवाई दलाने हाणून पाडले. दुसरीकडे पाकिस्तानच्या हद्दीत घुसलेली दोन विमाने पाडण्यात आली असून, दोन वैमानिकांना ताब्यात घेतल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. पण काही वेळातच पाकिस्तानकडून अशा प्रकारची कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.

पाकिस्तानकडून भारताची विमाने पाडून त्यातील दोन वैमानिकांना अटक केल्याचा दावा करण्यात येत होते. पाकिस्तानने त्यापैकी एक वैमानिक जखमी झाला असल्याचाही दावा केला होता. पण यासाठी पाकिस्तानने दाखवलेले व्हिडिओ आणि पुरावे खोटे असल्याचे समोर आले आहे. तसेच आधी झालेल्या विमान अपघाताचे व्हिडिओ पाकिस्तानकडून शेअर करण्यात आले आहे.

यादरम्यान पाकिस्तानचे लष्करी अधिकारी मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सांगितले की, भारताची दोन विमाने पाडून त्यातील दोन वैमानिकांना अटक केली आहे. पाडण्यात आलेल्या विमानांपैकी एक विमान पाकिस्तानच्या हद्दीत तर एक भारताच्या हद्दीत पडले, असा दावा त्यांनी केला होता.

Leave a Comment