महाराष्ट्राच्या या जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवणार राहुल गांधी ?

rahul-gandhi
मुंबई – अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तयारीला लागले असून ते त्यांच्या पारंपारिक अमेठी मतदारसंघाबरोबरच अन्य तीन जागांवरुन निवडणूक लढवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड आणि मध्य प्रदेशातील एखाद्या सुरक्षित जागेवरुन ते निवडणूक लढवतील असेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विधानामुळे राहुल गांधींच्या नांदेडमधून निवडणूक लढवण्याच्या चर्चेला पुष्टी मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे लोकसभेच्या कोणत्याही जागेवरुन यशस्वीपणे निवडणूक लढू शकतात, त्यांनी जर नांदेडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांचे स्वागत असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

२०१४ मध्ये अशोक चव्हाण हे नांदेडमधून लोकसभा निवडणूक जिंकले होते. जेव्हा एक महिन्यापूर्वी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ सदस्यांची बैठक घेतली तेव्हा कार्यकर्त्यांना त्यांनी याच वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले होते. कारण, चव्हाण हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार आहेत.

अमेठीतून राहुल गांधी हे तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. २००४ मध्ये गांधी यांनी राजकारणात प्रवेशाची घोषणा केली होती. ते २००४ मध्ये पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर २००९ आणि २०१४ मध्येही ते या ठिकाणाहून जिंकले होते. दरम्यान, २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये भाजपाने अमेठीतून राहूल गांधींविरोधात स्मृती ईरानींना उमेदवारी दिली होती. पण येथे त्यांचा पराभव झाला होता.

Leave a Comment